إعدادات العرض
ए बालका! मी तुजला काही शब्द मंत्र शीकवितो:अल्लाह चे रक्षण कर, अल्लाह तुझे रक्षण करीन, अल्लाह च्या आज्ञेचे पालन कर,…
ए बालका! मी तुजला काही शब्द मंत्र शीकवितो:अल्लाह चे रक्षण कर, अल्लाह तुझे रक्षण करीन, अल्लाह च्या आज्ञेचे पालन कर, अल्लाह तुझ्या सोबत असेन, जेव्हा केव्हा काही मागायचे असल्यास, फक्त आणी फक्त अल्लाह कडेच माग! काही गरज असल्यास अल्लाह समोर मांड
अब्दुल्ला बिन अब्बास रजिअल्लाहु अनहु कथन करतात की:एका दिवसी मी प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर संगतीत सवारी करत असतांना प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की: <<ए बालका! मी तुजला काही शब्द मंत्र शीकवितो:अल्लाह चे रक्षण कर, अल्लाह तुझे रक्षण करीन, अल्लाह च्या आज्ञेचे पालन कर, अल्लाह तुझ्या सोबत असेन, जेव्हा केव्हा काही मागायचे असल्यास, फक्त आणी फक्त अल्लाह कडेच माग! काही गरज असल्यास अल्लाह समोर मांड,आणी जाणुन घ्या कि समस्त मानवजात तुम्हाला फायदा पोहचविण्यासाठी जमा झाली,तरी फक्त तेवढाच फायदा पोहचवु शकेल,जेवढा अल्लाह ने तुमच्या नशिबात लिहुन ठेवला आहे, आणी जर सर्वांनी तुमचं नुकसान करु इच्छीले तरीही ते फक्त तेवढच नुकसान पोहचवु शकतील जेवढं अल्लाह ने लिहुन ठेवले आहे; लेखनी उचलुन ठेवल्या आहेत,व पुस्तकं लिखाण जुनी पुराणी झाली>>. तिरमीजी व्यतिरिक्त एका कथनात वर्णन आहे की:<<अल्लाह चे रक्षण करा, तुम्ही अल्लाह ला आपल्या जवळच उभं पाहसान, निवांत शांतता वेळी अल्लाह ला ओळखा,तो तुम्हाला अडचणी वेळी ओळखेन, आणी जाणुन असा की जी वस्तु तुम्हाला मिळणार आहे, तिला तुमच्या पासुन कुणीच हिरावु शकत नाही, आणी ज्या वस्तुला तुम्ही मुकला ती तुमच्या नशीबात नव्हतीच, जाणुन घ्या कि अल्लाह ची मदत संयमा सोबतच आहे, आणी बरकत सरलता अडचणी व परेशानी सोबत आहे, प्रत्येक अडचणी सोबतच त्यापासुन मुक्ती आहे>>.
الترجمة
العربية Español አማርኛ English اردو Indonesia বাংলা Français Türkçe Русский Bosanski සිංහල हिन्दी 中文 فارسی Tiếng Việt Tagalog Kurdî Hausa Português മലയാളം తెలుగు Kiswahili தமிழ் မြန်မာ ไทย Deutsch پښتو অসমীয়া Shqip Nederlands ગુજરાતી Кыргызча नेपाली Lietuvių دری Српски тоҷикӣ Kinyarwanda Română Magyar Čeština Moore Malagasy Oromoo ಕನ್ನಡ Wolof Azərbaycan O‘zbek Українська ქართული Македонски ភាសាខ្មែរ Bambara ਪੰਜਾਬੀ Kirundi Kurmancî Bahasa Melayuالشرح
इब्ने अब्बास अल्लाह प्रसन्न असो वर्णन करतात की ते बालपणात असतांना, प्रेषितांसमवेत अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर उंटस्वारी असतांना, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:मी तुम्हाला काही तत्व शीकवितो,जे तुम्हाला जिवनात उपयोगी असतील: अल्लाह चे रक्षण करा अर्थात तुम्ही अल्लाह च्या आदेशाचे पालन करा, त्याने मना केलेल्या कामा पासुन दुर रहा, सत्कर्मात व्यस्त राहा, जेव्हा मानव सत्कर्मात व आज्ञापालन करत राहतो, तर अल्लाह त्याचे रक्षण करतो, जगातील संकटावेळी व परलोकाच्या संकटातून सुद्धा आपल्या दासाची मदत करत असतो, जेव्हा काही गरज भासल्यास फक्त अल्लाह कडेच धाव घ्यावी, कारण खराखुरा दाता फक्त आणि फक्त एकमेव अल्लाहच आहे. कोणतीही मदत भासल्यास फक्त अल्लाह कडेच धाव घ्यावी. मानवाने ठाम विश्वास बाळगाला पाहिजे की संपुर्ण जग एकत्र मिळुन सुद्धा तुम्हाला फायदा पोहचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ची ईच्छा नसेल, आणी संपुर्ण जग एकत्र मिळुन तुम्हाला नुकसान पोहोचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ची मर्जी नसेल, अर्थात संपुर्ण जग एकत्र मिळुन सुद्धा तुम्हाला नुकसान पोहोचवु शकत नाही, जोपर्यंत अल्लाह ने तुमच्या नशिबात लिहुन ठेवले नसेल, जे नशीबाची लिहिले असेल ते घडणारच. आणि हे की हा मामला अल्लाह तआलाने आपल्या हिकमत आणि ज्ञानाच्या मागणीनुसार लिहिला व ठरविला आहे, आणि अल्लाहने जे लिहिले आहे त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही. जो व्यक्ती अल्लाहची जपणूक करतो, म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन करतो, आणि त्याच्या मनाई केलेल्या गोष्टींपासून दूर राहतो, अल्लाह त्याच्या पुढे असतो, त्याची अवस्था जाणतो, त्याला मदत करतो आणि त्याला आधार देतो, जो मनुष्य आनंदावेळी अल्लाह चे स्मरण करतो, अल्लाह त्याची संकटावेळी याद राखतो, मग त्यावर रहमत,मदत,व भलाई उतरवितो, आणि प्रत्येक मनुष्य अल्लाहने त्याच्यासाठी ठरवलेल्या भले वाईटावर संतोष मानावा, संकटावेळी धिर धरावा, सब्र व संयम सोबत अल्लाह ची मदत उतरते,जेवढी संकटात वाढ होते, त्याच्या सोबत आसानी म्हणजे सहजता व भरभरता सुद्धा उतरते.فوائد الحديث
तरुणांना आणि मुलांना एकेश्वरवाद, शिष्टाचार इत्यादी धर्माच्या गोष्टी शिकवण्याचे महत्त्व.
कामाच्या प्रकाराचा प्रतिशोध.
अल्लाहवर विसंबून राहण्याची आणि केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवण्याची आज्ञा, आणि तो सर्वोत्कृष्ट व्यवहार करणारा आहे.
नशीब आणि नशिबावर विश्वास आणि समाधान आणि अल्लाहने प्रत्येक गोष्टीचे नशीब लिहिले आहे.
जो अल्लाहचा आदेश नाकारतो, अल्लाह त्याचा नाश करेल, त्याचे रक्षण करणार नाही.
आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक अडचणी नंतर मुक्ति व आनंद आहे.
हे तत्व मानवाला संकटावेळी आश्वस्त ठेवतात,व आपल्या ह्रदयस्पर्षि वस्तुंच्या हिरावल्यावर सुद्धा मनाला शांती लाभते:<<आणि जाणून ठेव की तुला जे घडले ते चुकण्यासारखे नव्हते; आणि जे तुझ्यापासून चुकले ते तुला मिळण्यासारखे नव्हते>> पहिले वाक्य अप्रिय घटना घडल्यावर दिलासा देते, आणि दुसरे वाक्य प्रिय गोष्ट हातून गेल्यावर सांत्वना करते.
