मी तुम्हाला ज्या गोष्टी पासुन रोकतो, तुम्ही जरुर त्या गोष्टींपासुन सावध राहा आणी ज्याचा आदेश देतो, त्यावर…

मी तुम्हाला ज्या गोष्टी पासुन रोकतो, तुम्ही जरुर त्या गोष्टींपासुन सावध राहा आणी ज्याचा आदेश देतो, त्यावर ऐपतीनुसार

हजरत अबु हुरैरा अबदुर्हमान बिन सखर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर फरमावितांना ऐकले की: <<मी तुम्हाला ज्या गोष्टी पासुन रोकतो, तुम्ही जरुर त्या गोष्टींपासुन सावध राहा आणी ज्याचा आदेश देतो, त्यावर ऐपतीनुसार आचरण करा, तुमच्या पुर्वज याच कारणामुळे नष्ट झाले, कारण ते आपल्या पैगंबरांवरच प्रश्नांचे भडिमार करत होते, व त्या पैगंबरांची अवहेलना व आपसात मतभेद करत होते>>.

[صحيح] [رواه البخاري ومسلم]

الشرح

अल्लाह च्या अंतिम प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या गोष्टी पासुन तुम्हाला मना करण्यात आले आहे, त्यापासुन पुर्णपणे दुर राहणे अत्यावश्यक आहे, त्यात कसलीही सवलत नाही, आणी जर तुम्हाला पैगंबरांनी आदेश दिला तर तुमच्या शक्तीनुसार त्यावर अंमलबजावणी करणे जरुरी आहे. प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आम्हाला स्पष्टपणे ईशारा दिला, आम्ही मागील उम्मता [समुहा] प्रमाणे घोडचुक करु नये, ज्यांनी आपल्या पैगंबरांना विविध प्रश्नोत्तरांनी व त्यांची अवज्ञा करुन अपमानीत केले, त्यामुळे सर्वोच्च अल्लाह ने त्या लोकांना विविध प्रकारच्या संकटानी व प्रकोपांनी घेरले, म्हणुन आम्ही त्या लोकांसारखे आचरण करु नये, अन्यथा आमच्यावर सुद्धा तोच प्रकोप व राग ओढवु शकतो.

فوائد الحديث

सदर हदिस वरुन सिद्ध होते की, ज्या गोष्टी पासुन मनाई करण्यात आली आहे, त्यांना टाळणे अनिवार्य आहे, व ज्या गोष्टींचा आदेश दिला आहे, त्यावर अंमलबजावणी करणे जरुरी आहे.

निशीद्ध गोष्टीं बाबत कुठलीच सुट नाही, परंतु आज्ञा केलेल्या गोष्टीवर अंमलबजावणी आपल्या ताकत नुसार वर्तविली आहे, कारण मना केलेली कामे टाळणे मनुष्याच्या अखत्यारीत असतात, आणी अंमलबजावणी करण्या करिता ऊर्जा व शक्तीची गरज भासते.

अनेक प्रश्नांची बंदी. विद्वानांनी प्रश्नाचे दोन वर्ग केले आहेत. पहिल्या वर्गात धर्माच्या अत्यावश्यक मुद्द्यांशी संबंधित प्रश्न आहेत, ज्याचा उद्देश शिकणे आहे, या प्रकारचे प्रश्न विचारण्याचे आदेश दिले आहेत आणि सोबत्यांचे प्रश्न त्याच प्रकारचे असायचे, दुसऱ्या वर्गात प्रश्न आहेत, जे तंटा आणि तकलाफ म्हणून विचारले जातात, असा प्रश्न विचारण्यास मनाई आहे.

या उम्माला पूर्वीच्या राष्ट्रांप्रमाणेच त्यांच्या पैगंबराच्या विरोधात न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निशीद्ध गोष्टीं मग त्या थोड्या असो कि जास्त सर्व हराम आहेत, त्या टाळणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा छोट्या किंवा मोठ्या सर्वच स्तरावर रोकथांभ झाली पाहिजेउदाहरणार्थ व्याज,मग थोड्या प्रमाणात असो की जास्त निशीद्ध आहे.

त्या सर्व मार्गांपासुन अलिप्त राहणे जरुरी आहे,जे तुम्हाला निशीद्ध मार्गांकडे नेतात, आणी हेच अपेक्षित आहे.

आपणा समोर जेव्हा प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर आदेश आला तेव्हा आमच्या कडुन अशी विचारणा होता कामा नये की सदर आदेश अनिवार्य दर्जाचा आहे की पसंदप्राप्त आहे, किंबहुना अगत्याचे हे आहे की, ताबडतोब आज्ञेवर अंमलबजावणी करणे सुरू करायला पाहिजे, कारण आदेश हा आहे की<<तुमच्या ऐपतनुसार अंमलबजावणी करा>>.

विनाकारण व अतोनात प्रश्न करणे बरबादीचे लक्षण आहे, विशेषकरुन त्या गोष्टी मध्ये ज्यामध्ये आमची बुद्धी ज्याच्या मुळापर्यंत पोहचु शकत नाही, ऊदाहरणार्थ परोक्षाचे ज्ञान [पडद्या मागील बाबी] किंवा कयामत च्या विषयी प्रश्न करणे, अशा बाबतीत अति प्रमाणात प्रश्न करण्यापासुन वाचणे जरुरी आहे, जेणेकरून मनुष्य येणाऱ्या संकटा पासुन व मर्यादा ओलांडणाऱ्यांच्या पंगतीत जाऊ नये.

التصنيفات

Pre-Islamic Prophets and Messengers, peace be upon them